Monday, April 20, 2020

यशवंत च्या निमित्ताने 2

यशवंत च्या निमित्ताने 2

खरंतर आज सकाळीच यशवंत च्या निमित्ताने लिहून वाचक,प्रसारक, आणि प्रतिसादक यांचे विषयी ऋण व्यक्त केले आहे. अजूनही प्रतिक्रियांचा अजूनही प्रतिक्रियांचा ओघ काही अटला नाही. 

माझ्या जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा अंगापूर नं. 1ता.जि.सातारा च्या सर्वच सहकाऱ्यांनी वेळोवेळी प्रेरक प्रतिक्रिया देवून माझा उत्साह वाढविला आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार.

तसेच दुधगाव,पाटण,सातारा व मनोर जि.पालघर  व डी.एड च्या माझ्या सर्व सहकाऱ्यांनी प्रतिक्रिया देऊन माझा उत्साह वाढविला आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार.

शिवाय अनेक मार्गदर्शकांनी फोन करून शुभेच्छा आणि मार्गदर्शन केले त्यामध्ये प्रामुख्याने श्री.आर.के.जाधवसर, श्री.सदाशिव कणसे सर, श्री. जयवंत कणसे सर, सौ. रुक्मिणी कणसे मॅडम, सौ सुनिता गरुड मॅडम व सौ राजश्री थोरात, सौ. रत्नप्रभा किणी यांचा समावेश आहे.

संत कबीर आपल्या एका दोह्यामध्ये म्हणतात, 
 "जब गुण को गाहक मिले, तब गुण लाख बिकाई।
जब गुण को गाहक नहीं, तब कौड़ी बदले जाई।"  अर्थात जेव्हा तुमच्यातील गुण शोधणाऱ्या व्यक्ती असतात. तेंव्हाच गुणांची खरी पारख व किंमत होते. असेच रत्नपारखी सुप्रसिद्ध शिवशंभू व्याख्याते श्री. सागर पवार सर क्षेत्रमाऊली ता.जि.सातारा यांनीही फोन करून, बहुमोल असे मार्गदर्शन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. 

आपल्या लेखनाची शैली अतिशय सुरेख आहे. आपले लेखन अतिशय प्रेरणादायी आहे. आपले लेखन असेच सुरू राहावे. लवकरच एक पुस्तक प्रकाशित करावे. अशा संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया अनेक वाचक मित्रांनी दिल्या आहेत. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. 

आपले हे प्रेम आपण "यशवंत - एक प्रेरणास्त्रोत " वर कायम  राहावं हीच विनंती.

धन्यवाद,
श्री. संदिप पाटील,
दुधगाव.
9096320023

_&_&_&_&_&_&_&_&_&_&_&_

उत्तम कवी,लेखक,ज्योतिषी आणि प्रसिद्ध युट्यूबर व माझे वर्गमित्र श्री. रमेश रावळ यांनी दिलेली प्रतिक्रिया...

काय म्हणू.. प्रिय मित्र संदिप कि माननीय सर... जरी अजून आपले लहान पणीचे दिवस आठवत असतील तरी स्वतःच्या कर्माने, धाडसाने, कष्टाने आज तू एक आदर्श शिक्षक झाला आहेस.. म्हणून माननीय शिक्षक महोदय असे संबोधनेच योग्य..

माननीय शिक्षक महोदय,

  आपल यशवंत ही लेख मालिका चालू करून खरेच एक अनमोल काम केले आहे.. तुमच्या या कामाचे तुम्हाला जितके कौतूक नसेल  त्याहून जास्त आम्हाला कौतूक व अभिमान आहे कारण आपल्या गावातील एक व्यक्ती जेंव्हा एवढ्या यशाच्या शिखरावर पोहचते तेंव्हा अभिमान हा वाटतोच आणि त्यातही तो आपला वर्गमित्र आहे म्हणून सांगताना अंगी मूठभर मांस चढत.. आपल्या यशवंत मालिकेतून आम्ही हे शिकलो कि यश हे पैसा, कौटुंबिक पार्श्वभूमी पाहून, रंग-रूप पाहून मिळत नाही तर ते फक्त आणि फक्त जिद्द, कष्ट, ध्यास आणि दिर्घोदयोगीपणा या जोरावर मिळत असते.. तुम्ही समाजातील प्रत्येक स्थरावरील, वेगवेगळ्या भौगोलिक पातळीवरील व वेगवेगळ्या क्षेत्रातील यशस्वी लोकांना आम्हांपर्यंत पोहचवण्यात तुम्ही यशस्वी झाले आहात म्हणून तुम्ही सुध्दा एक यशवंत झाला आहात.. आणि त्यावरूनच आम्हाला हि यशाचे महत्त्व व त्याची किंमत कळू लागली आहे व जर हे आपल्या सारखे सामान्य लोक इतके यशस्वी होऊ शकतात तर आम्ही सुध्दा निश्चितच होऊ शकतो हा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.. आणि अजून एक मोलाची गोष्ट ही आम्हाला समजली कि यश म्हणजे पैसा मिळवणे नव्हे.. तुम्हच्या लेखमालेत सर्व प्रकारच्या यशस्वी लोकांची माहिती तुम्ही दिलीत.. ते सर्व जण यशस्वी झाले असे तुम्ही मानले ते त्यांनी जे ठरवले ते मिळवले म्हणून.. अनेक नाऊमेद झालेल्या मनाला तुम्हच्या या लेखामुळे नवीन उमेद मिळाली आहे व ते परत एकदा यशस्वी होण्याकडे वाटचाल करीत आहेत याचे श्रेय नक्कीच तुम्हाला जाते... असेच लिहित रहा व नवनवे यशवंत, त्यांचे लढे, त्यांचा संघर्ष व त्यांचे यश आम्हां पर्यंत पोहोचवत रहा.. पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐







No comments: