Tuesday, February 24, 2026

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेतील यशाच्या निमित्ताने आभार प्रदर्शन

 🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेतील यशाच्या निमित्ताने आभार प्रदर्शन...*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

“मुलाखतींचा प्रवास – संवाद कौशल्याचा विकास” हा नवोपक्रम राज्यस्तरीय स्पर्धेत इयत्ता तीन ते पाच गटात द्वितीय क्रमांकाने गौरविण्यात आला. हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा, अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण आहे. या यशामागे अनेकांचे सहकार्य, मार्गदर्शन आणि प्रेरणा लाभली आहे. त्या सर्वांप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.


सर्वप्रथम डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता श्री. गदगडे सर, ज्येष्ठ अधिव्याख्याता सौ. अंजली रसाळ मॅडम, जिल्हा शिक्षण विस्ताराधिकारी डॉ. विमल माने मॅडम यांनी मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे नवोपक्रमाची दिशा स्पष्ट झाली आणि सादरीकरण अधिक प्रभावी करता आले. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.


वाळवा पंचायत समिती, ईश्वरपूर येथील गटविकास अधिकारी डॉ . आबासाहेब पवारसाहेब, गटशिक्षणाधिकारी श्री. सुनील आंबी साहेब, विस्ताराधिकारी सौ. छायादेवी माळी मॅडम, विस्ताराधिकारी श्री. संजय पाटील साहेब, केंद्रप्रमुख श्री. अनिल नरदेकर साहेब यांनी सदर नवोपक्रम राबविण्यासाठी प्रेरणा दिली. त्यांचेही मनापासून आभार.


तसेच नवोपक्रम विभागाच्या प्रमुख सौ. ज्योती भोकरे भोई मॅडम व श्री. महेश पाटील सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांचेही मनापासून आभार.


माझ्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शमा महाब्री मॅडम, तसेच सहकारी शिक्षकवृंद सौ. अपर्णा ढोले मॅडम, सौ. शारदा मस्के मॅडम, श्री. प्रविण यटम सर, श्री. शरद पाटील सर, श्रीमती अर्चना माने मॅडम, श्री. संभाजी पाटील सर, श्री. महेश कारंडे सर आणि नुकतीच बदली झालेल्या सौ. वैशाली कोळी मॅडम यांनी नवोपक्रम राबविताना मला आवश्यक सहकार्य, वेळ आणि प्रोत्साहन दिले. त्याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे.


या नवोपक्रमाचे खरे शिल्पकार म्हणजे माझ्या इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनी. त्यांच्या उत्साहामुळे, जिज्ञासेमुळे आणि सक्रिय सहभागामुळे हा उपक्रम यशस्वी झाला. त्यांनी निर्भीडपणे मुलाखती घेतल्या, प्रश्न विचारले, संवाद साधला आणि स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणला. त्यांचे मी विशेष कौतुक करतो व आभार मानतो.


पालकवर्ग, आजी-आजोबा, शेजारी आणि गावातील विविध क्षेत्रातील व्यक्तींनी विद्यार्थिनींना मुलाखती देऊन या उपक्रमाला सामाजिक आधार दिला. त्यांच्या सहकार्यामुळे शाळा आणि समाज यांचा सुंदर संवाद घडून आला. त्यांचेही मनापासून आभार.


बागणी केंद्रातील वाळवा तालुक्यातील असंख्य शिक्षक मित्रांनी नवोपक्रमातील यशाबद्दल माझे कौतुक व अभिनंदन केले. त्याबद्दल त्यांचेही मनःपूर्वक आभार.


या नवोपक्रमाच्या लेखन, मांडणी आणि सादरीकरणासाठी माझ्या पत्नी सौ. राजश्री यांनी मोलाचे पाठबळ दिले. त्यांच्या सहकार्यामुळे व प्रोत्साहनामुळे हे कार्य सातत्याने करता आले. त्यांचेही मनापासून आभार.


हा नवोपक्रम केवळ स्पर्धेपुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयुक्त ठरेल, असा माझा विश्वास आहे. या यशाने मला भविष्यात अधिक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची प्रेरणा दिली आहे.


सर्वांचे मनःपूर्वक आभार…!