Wednesday, May 27, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग- 160

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯  भाग- 160
🎯  श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.

_माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सामील होण्यासाठी वरील क्रमांकावर नाव आणि पत्ता(जिल्हा)पाठवा._

वय एकवीस म्हणजेच मौजमजा करण्याचा वय. पण,या मौजमजा करण्याच्या वयात एका तरुणाने स्वतःची कंपनी सुरू केली आणि आज त्या कंपनीची किंमत हजारों कोटींच्या घरात पोहोचली आहे. त्या तरुणाला हे कसं शक्य झालं काय आहे ? कोण हा तरुण ? काय त्याचा संघर्ष ? जाणून घेऊ आजच्या भागात चला तर मग....

16 नोव्हेंबर 1993 रोजी उडीसा राज्यातील कटक जिल्ह्याच्या ठिकाणी एका सधन व्यावसायिक कुटुंबामध्ये रितेश चा जन्म झाला. वडील एक बांधकाम व्यावसायिक आणि गृहिणी. बारावी पर्यंतचे शिक्षण कटक मध्येच झाले. त्याने पुढील शिक्षक IIT मध्येच पूर्ण करावे. ही घरच्यांची इच्छा. म्हणून तो राजस्थान मधील कोटा येथे आला. घरची आर्थिक स्थिती उत्तम असल्याने त्याला कशाची कमी नव्हती.

कोटा येथे आल्यानंतर रितेशने दोनच गोष्टी केल्या. एक अभ्यास आणि दुसरे म्हणजे भरपूर प्रवास. प्रवास त्याचा आवडीचा विषय होता. त्याने प्रवासात अनेक चांगले वाईट अनुभव घेतले. एक दिवस तो टिव्ही बघत बसला होता. त्याच्या हातात रिमोर्ट होता. त्या रिमोर्ट मुळे त्याच्या मनात एक विचार आला. " जसे रिमोर्ट च्या आधारे आपण कोणतेही चॅनल लावू शकतो, तसेच आपण असे काही तरी करावे की, भारतभरातील पर्यटकांना एका क्लिकवर हवं ते हॉटेल बुक करता येईल." त्याच्या या विचाराने जोर धरला. तो आपली कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी धडपड करू लागला.

2012 साली म्हणजेच वयाच्या 19 व्या वर्षी त्याने स्वतः ची एक वेबसाईट सुरू केली. ज्या आधारे भारतातील कोणत्याही पर्यटकाला कोणतेही हॉटेल क्षणात बुक करता येईल. त्याची ही कल्पना पाहून काही गुंतवणूकदारांनी त्याच्या या व्यवसायात गुंतवणूक केली. शिवाय त्याच्या या कल्पनेला एक फेलोशिप देखील मिळाली.खूपच कमी वेळामध्ये आपल्या स्टार्टअपला मिळालेल्या या यशामुळे रितेश खूपच उत्साहीत झाला आणि त्याने आपल्या स्टार्टअपवर अजून बारकाईने काम करण्यास सुरूवात केली. पण, त्याचे हे बिझनेस मॉडेल यशस्वी होऊ शकले नाही. कंपनी तोट्यात जावू लागली आणि सरतेशेवटी त्याला ती बंद करावी लागली.

नुकसान झाले होते. अशाने एखाद्याचे मनोबल खचले असते. पण, या घटनेने तो अधिकच प्रेरित झाला. त्याचा त्याच्या कल्पनेवर आणि स्वतः वर विश्वास होता. त्याने आपल्या अपयशाची कारणे शोधली. आपले प्रवासातील अनुभव आठविले. स्वतःच्या झालेल्या चुका शोधल्या. त्या सुधारून प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन त्याने एक नवी कंपनी स्थापन केली. लोकांना कमी किंमतीमध्ये सर्वोत्तम, चांगल्या आणि आरामदायी रूम मिळू लागल्या. अल्पावधीतच त्याचा स्टार्टअप लोकप्रिय झाला आणि तो अब्जाधीश झाला. ती लोकप्रिय कंपनी म्हणजे ओयो रूम्स आणि त्याचा संस्थापक म्हणजेच रितेश अग्रवाल होय.

ऑनलाईन हॉटेल सर्च करून आपल्या बजेटमध्ये बसणाऱ्या रूम ओयो आपल्याला उपलब्ध करून देते. त्यामुळेच ती अतिशय लोकप्रिय बनली.

आपण सदैव कष्ट करत राहिले पाहिजे, मेहनत घेतली पाहिजे. तरच यश आपल्या पदरात पडेल.
अपयश तर येतच राहणार. पण, त्यातही जिद्दीने पाय रोवून, उभे राहून आपण आपली क्षमता सिद्ध केली पाहिजे.

माणसाच्या यशामध्ये विचारांचा वाटा मोठा असतो. एखादा विचार, एखादी कल्पना आपल्या मनात आली की,आपण त्यावर लगेचच काम केलं पाहिजे. तरच आपण यशस्वी होऊ शकतो. अन्यथा आपले विचार,कल्पना इतरांच्या माध्यमातून मूर्त स्वरूपात येतात. त्यावेळी आपणावर पश्चाताप करत बसावे लागेल. रितेश अग्रवाल ने आपली कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी शिक्षण अर्धवट सोडले. आणि आपली संपूर्ण ताकद या कल्पनेवर लावली. म्हणूनच तो 2020 च्या ह्यरून ग्लोबल रिच लिस्ट नुसार जगातील दुसर्‍या क्रमांकाचा स्व: निर्मित अब्जाधीश आहे. म्हणूनच तो एक यशवंत आहे. 

*कृपया ब्लॉग फॉलो करा....*

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद..



🎯 *भाग - 159* वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/05/159.html




No comments: