Tuesday, November 20, 2018

यशवंत – एक प्रेरणास्रोत भाग 70

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 70*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत* ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी पोस्टच्या शेवटी लिंकवर क्लिक करा.


*1994 साली एका महिलेच्या जीवनावर आधारित चित्रपट आला. या चित्रपटाची बरीच चर्चा झाली. या  चित्रपटाचा वाद न्यायालयातही गेला. या चित्रपटाचा वाद विकोपाला गेल्यामुळे, या चित्रपटाच्या पटकथा लेखिकेने चित्रपटसृष्टीला कायमचा रामराम ठोकला. चित्रपटाचा वाद वाढण्यामागचे कारण काय ? तो चित्रपट कोणता ? ती पटकथा लेखिका कोण ? पुढे काय झाले तिचे ? जाणून घेऊ आजच्या भागात..*

24 नोव्हेंबर 1961 ला तिचा जन्म तत्कालीन आसाम मधील शिलाँग मध्ये झाला. सध्या शिलाँग मेघालय राज्याची राजधानी आहे. वडील बंगाली हिंदू तर, आई ईसाई. वडील चहाच्या बागेचे व्यवस्थापक होते. ती दोन वर्षाची असतानाच तिच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला. ती आईबरोबर केरळला गेली. आई महिलांच्या अधिकारांसाठी लढणारी कार्यकर्ती. आईचा अन्यायाविरुद्ध  लढण्याचा संस्कार तिच्यावर बालपणापासूनच झाला. 16 व्या वर्षी ती आर्किटेक्चर च्या शिक्षणासाठी दिल्लीला आली. याच काळात तिची भेट एका आर्किटेक्ट सोबत झाली. दोघांनी लग्न केले. पण, चारच वर्षात ते वेगळे झाले. ती नोकरीला लागली. 1984 साली तिची भेट चित्रपट दिग्दर्शक प्रदीप कृष्णन सोबत झाली. त्यांनी तिला आपल्या चित्रपटात तिला संधी दिली. तिने या संधीचे सोने केले. तिला चित्रपटात काम मिळू लागले आणि ती चित्रपटासाठी पटकथा लिहू लागली. नंतर दोघांनी लग्न केले. 1988 साली तिने एका नाटकासाठी लिहालेल्या पटकथेसाठी राष्ट्रीय पुस्कारही प्राप्त झाला. 

1994 साली फुलन देवी यांच्या जीवनावर आधारित Bandit Queen या चित्रपटाच्या बाबतीत अनेक वाद निर्माण झाले म्हणून, तिने चित्रपटसृष्टीला कायमचा रामराम ठोकला आणि तिने स्वतः ला लेखनासाठी वाहून घेतले. आपल्या प्रतिभेची, क्षमतेची तिला जाणीव होती. त्यामुळेच, तिने चित्रपटसृष्टीचा नाद सोडून, पूर्ण वेळ लेखनाकडे वळली. याकाळात आर्थिक स्थैर्यासाठी नोकरी आणि शिकवणी घेतली. ती एक प्रतिभाशाली लेखिका असल्याने, तिचे लेखन, लोक आवडीने वाचू लागले. 1997 साली तिने आपली पहिली कादंबरी "The God Of Small Things" पप्रकाशित केली. त्या वर्षी या पुस्तकाला साहित्य क्षेत्रातील मानाचा बुकर पुरस्कार मिळाला आणि *बुकर पुरस्कार मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. ती फर्स्ट लेडी म्हणजे अरुंधती रॉय.*

व्यक्तीच्या आयुष्यातील प्रसंग, त्याला यशाच्या शिखराकडे मार्गक्रमण करण्यास मदत करत असतात. जसे की, अरुंधती रॉय यांना Bandit Queen या चित्रपटाच्या बाबतीत अनुभवास आले. या घटनेने त्याचे संपूर्ण जीवनच बदलले. जीवनात येणारे वाईट प्रसंग, दुःख, अडचणी या बदल घडविण्यासाठीच येत असतात. अशा प्रसंगात आपण सकारात्मक राहून मार्गक्रमण करत राहिले पाहिजे. यशाचे शिखर आपोआप सर होईल.

*2014 साली टाइम्सने जगातील शंभर प्रभावी महिलांच्या यादीत अरुंधती रॉय यांचा समावेश करून, त्यांचा सन्मान केला आहे. म्हणूनच, त्या एक यशवंत आहेत.*

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!



No comments: